Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

विवाहप्रसंगी शिवरायांच्या आरतीचा पांयडा नको कुंडली पेक्षा कर्तुत्वाला महत्त्व द्या :- वसंतराव मुळीक

 * कोल्हापूर प्रतिनिधी किशोर जासूद* विवाहप्रसंगी शिवरायांच्या आरतीचा पांयडा नको* *कुंडली पेक्षा कर्तुत्वाला महत्त्व द्या :- वसंतराव मुळीक* अ...

 *कोल्हापूर प्रतिनिधी किशोर जासूद*



विवाहप्रसंगी शिवरायांच्या आरतीचा पांयडा नको*

*कुंडली पेक्षा कर्तुत्वाला महत्त्व द्या :- वसंतराव मुळीक*




अखिल भारतीय मराठा महासंघचा वधू वर पालक  मेळावा उत्साहात राजर्षी शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाला यावेळी मेळाव्याचे स्वागत चंद्रकांत चव्हाण यांनी केले प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी वधु वर मेळावा घेणे ही काळाची गरज बनली आहे आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे 

यावेळी बोलताना मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले

सध्या विवाह प्रसंगी वधू-वरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्याचा नवीन पायंडा पडत आहे. याविषयी मेळाव्यात असे ठरले की छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे प्रेरणास्थान असून विवाह प्रसंगी त्याचा पुतळा पुजन करून स्मरण करने ही जमेची बाजू असून स्फुर्ती देणारीही आहे. त्यांनी व्यक्ति म्हणून केलेला पराक्रम संपूर्ण जगाला आदर्श आहे अशा या पराक्रमाला दैवत्व दिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व संपेल. तरी समाजाने विवाहप्रसंगी व विविध कार्यक्रमा प्रसंगी शिवरायांचे पुजन करावे पण आरती करण्याचा नवा पायंडा पाडू नये असा ठराव करण्यात आला. यावेळी बोलताना वसंतराव मुळीक यांनी कुंडली पेक्षा कर्तुत्वाला महत्व द्यावे सध्या मुला मुलींची वये ३५ पेक्षा जास्त वाढत असून मुलांच्या पालकांचे परजिल्ह्यातून आर्थिक   फसवणूक होत आहे तरी पालकांनी सावध रहावे. विवाह प्रसंगी  ९६  कुळीचा बाऊ करू नये, पालकांनी दोनदा अक्षता टाकून चुकीचा पायंडा घालू नये असेही वसंतराव मुळीक यांनी सांगितले.

 यावेळी  विवाहातील अडचणी विषयी अनेक पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मेळाव्याला  एकूण १२७ नोंदी झाल्या.

या मेळाव्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता राहुल तोंडले, महेश कांजर,सदाशिव कृष्णात पवार राजदीप सुर्वे, मानसिंग जाधव, इंजिनिअरिंग व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष मंडलिक, शरद साळुंखे यांचे सत्कार करण्यात आले

सूत्रसंचालन युवक जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील यांनी केले 

यावेळी शंकरराव शेळके, प्रकाश जाधव, शिवाजी मोरे, डॉ लक्ष्मीकांत नलवडे, सरदार पाटील, जयसिंगराव हवालदार, प्रताप नाईक, मिलिंद चव्हाण, सचिन इंगवले, डॉ विद्या साळुंखे, संयोगिता देसाई, संजीवनी चौगुले, मीनल मुळीक, पूजा मुळीक यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments